Water Levels Rise in Dams: राधानगरी १०० टक्के भरले; वाचा कोयना व वारणा धरणांसह 'या' १३ धरणांत झाला किती पाणीसाठा?

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाच्या विविध स्वरूपामुळे पाणीसाठा वाढला आहे. कोल्हापूर शहरात हलका भुरभुर पाऊस पडला, तर पश्चिमेकडील तालुक्यात जोरदार सरी कोसळल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाच्या विविध स्वरूपामुळे पाणीसाठा वाढला आहे. कोल्हापूर शहरात हलका भुरभुर पाऊस पडला, तर पश्चिमेकडील तालुक्यात जोरदार सरी कोसळल्या. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सकाळी उघडले गेले असून, भोगावती नदीत प्रति सेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात ३०.७ फुटांवर स्थिरता राहिली, तर अद्याप ४५ बंधारे पाण्याखाली आहेत. चार धरणांमधील विसर्ग थांबल्यानंतरही, जिल्ह्यातील इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. बुधवारी दूधगंगा, कुंभी, पाटगाव आणि चिकोत्रा धरणांतून पाण्याचा विसर्ग थांबला, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली आणि शित्तुर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने, धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी रात्री आठ वाजता वक्र दरवाजाद्वारे ५००० क्युसेक विसर्ग वाढवून ५७०० क्युसेक करण्यात आला. विद्युत गृहातून सुरू असलेल्या १४०० क्युसेक विसर्गात २०० क्युसेक वाढ करून एकूण ७३०० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे शाखाधिकारी सुदाम कुंभार यांनी स्पष्ट केले. सध्या वारणा धरणात एकूण ३०.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, तर एकूण ३४.४० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.



















